Sunday 31 January 2016

Self Health -Dr Aniruddha Bapu

बापूंनी self health विषयावर दिलेले व्याख्यान आणि मी पाहिलेला बापू हा प्रत्यक्ष विषेशांक मधून काढलेले नोट्स
SELF HEALTH LECTURE BY DR ANIRUDDHA JOSHI

Sunday 17 January 2016

देऊळ बंद2 #नशिबावर चकवा #अनिरुद्ध #पितृवचन

"हातावर नशीब , नशिबावर चकवा  चकाव्यावर मात " असेच काहीसे शब्द शास्रज्ञाला बोलतो एक वाटाड्या अशिक्षित ओल्ड मॅन , वृद्ध गृहस्थ .

साई सच्चरितात 32 व्या अध्यायात वाट हरवलेले चार सुबुद्ध आणि त्यांना प्रेमाने भाकर खाऊ घालणारा अशिक्षित वणजारी आठवल्या वाचून राहात नाहीत.

" क्या ढूंडता है मुसाफिर कांधे पर सवाल लिये . जिसका जवाब दिया है खुदाने खुद साथ रहके "

हे शब्द एका फकिराचे शब्द आमच्या साठी मोलाचे ठरतात .

हातावर नशीब ; आपल्याला हवा असलेला पासवर्ड आमच्या हातावरच असतो . आमाचा मायबाप सखा सद्गुरु पिता आमच्या साठी दर गुरुवारी येऊन आमच्या पुढे उभा असतो . हेच आमचे हातावरचे नशीब .

आणि तरीही आमचे वर्तुळाकार फिरणे चालू राहते @चिन्हासारखे . कोठेही न पोहंचणारे . हाच आमचा नशिबावर चकवा .

चकव्यावर मात फक्त "तो"च करू शकतो कारण "तो" स्वतः त्यासाठीच आलेला असतो म्हणून . आणि त्याचा तो स्वभाव आहे म्हणून .

चकव्यावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्ट करणे आवश्यक असते , ती म्हणजे त्याचे अस्तित्व स्वीकारणे .


वणजाऱ्याच्या कथेत गुरू " उलटे टांगतात म्हणजेच . ह्या चकव्यावर मात देतात . "
आम्हाला आमचे पाय बांधून घेण्यास विरोध करता कामा नये .

असेच प्रश्न घेऊन दिवस रात्र आम्ही भरकटत राहतो . गोल गोल .

स्वतःला चकवा देत राहतो .

आमच्या गाडीची स्टिअरिंग "त्या"च्या हातात देण्यास आम्ही तयार नसतो .

" हा देहाची नाही जेथे आपुला , तोचि साई चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला काय आपुला अधिकार "

हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही .

जेव्हा बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या  शास्त्रज्ञ मनाला आपण सद्गुरु चरणी समर्पित करू तेव्हा ...

आणि तेव्हाच सर्व कोडे उलगडतात .

सर्व आनंदाच्या राशी घेऊन , सरकारचा खजिना घेऊन तो आमच्या साठीच उभा असतो .

युगे अठ्ठाविस
.
हरी ओम श्री राम अम्बज्ञ .

Saturday 16 January 2016

देऊळ बंद निमित्ताने

देऊळ बंद च्या निमित्ताने

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितल्या पासून "देऊळ बंद " पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती पण पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हता .
त्यांच्याच कृपेने योग जुळून आला .

प्रत्येक मानवाच्या मनाचा लेखा जोखा म्हणजे देऊळ बंद .
मना मध्ये आस्तिक आणि नास्तिक भाग असतात 'त्याची प्रतीके हि शास्त्रज्ञ आणि भोळा भाविक 'आहेत .

वर करणी आम्ही स्वतःला आस्तिक म्हणवतो पण मनात कुठे तरी विरोध चालूच असतो , "देवा तू हे काय केलेस "

"काय माझ्या आयुष्यात वाढून ठेवलेस "

हे सर्रास वापरण्यात येणारी वाक्ये म्हणजे एक प्रकारे नास्तिकताच ।

देव हा पूर्ण न्यायी आहे आणि योग्य वेळी तो योग्य ते देतोच । योग्य आयोग्य तो जाणतोच ।


हा विश्वास जसा दृढ होत जातो तशी श्रद्धा सबळ होत जाते ।

स्वामी समर्थ ज्या प्रमाणे शास्त्रज्ञा सोबत अडचणी प्रसंगी सतत होते तसेच सद्गुरु तत्व आपल्या बरोबर राहावे अशी आम्हाला सतत इच्छा असते । बापू आम्हाला सांगतात "जर मोठ्या प्रसंगात तो आपल्याला सोबत पाहिजे असेल तर छोटया छोट्या गोष्टीत देखील त्याला बोलवता आले पाहिजे . "

आम्हाला हवी ती मजा करताना तो नको असतो आणि अडचण आली कि हवा असतो । म्हणून आमचा वेळोवेळी घात होतो ।

साई सच्चरितात बाबा हेमाड़पंतांना स्पष्ट विचारतात "चणे खाताना माझी आठवण काढतोस काय ? मला चणे देतोस काय ? "
आपल्या सर्व कृतीमध्ये "त्याला बोलावणे " हीच खरी श्रद्धा आहे ।

अन्यथा आमचा "पासवर्ड हरवलेला शास्त्रज्ञ " होतो ।
आणि असे होऊ नये म्हणून त्याच्या "शब्दात राहणे "
"त्याची आठवण स्मरण करत राहणे "
"त्याला सतत बोलावत राहणे "

हाच खरा "मास्टर पासवर्ड "

मानवाच्या मनातील "देऊळ बंद " होऊ देत नाही ।

Vector Ink - Work Place